Total Pageviews

Saturday, April 5, 2014

Do we really have an option?

फेसबूकची भिंत रंगून गेलीय निवडणुकीच्या वार्तांनी, 'वोट करा' म्हणून आवळल्या गेलेल्या जाहिरातींनी.. आणि मला आज एक प्रश्न पडला म्हणून पुन्हा एकदा नेहमी प्रमाणेच खरडल्या चार ओळी. (तेवढच आपला बुद्धीविलास केल्याचं समाधान)
देशाची पूर्ण वाट लागली असून आपला सर्वांच्या आयुष्याचा मस्तपैकी सत्यानाश झाल्यावर नेहमीप्रमाणे सर्व नेत्यांनी छाती ठोकून ठोकून पुन्हा एकदा सिद्ध केलंय कि ते कित्ती लायकीदार आहेत आणि फक्त आणि फक्त त्यांना निवडून दिल्यानेच कसे आपले भले होणार आहे. मग कुठे तरी माझ्या एका वर्ग मित्राने मोदींच्या चिंध्या उडवून स्वत:च्या मनाची शांती करून घेतली,  टोकाला जायचं तर लायकी नसतानाही काँग्रेसला मत देण्याचे सूतोवाचही करून तो मोकळा झाला. पण त्याने एक बरं केलं, हे सांगून कि आपल्याकडे काही Option च नाहीये.
खरंच… Do we really have an option? कुठे उमेदवाराची लायकी नाही कुठे पार्टीच्या नावाने बोंबाबोंब. मतदारांमध्ये जागरूकता पसरवणाऱ्या एका चित्रफितीत नेत्यांची माहिती देणाऱ्या App मधे असणारा 'Criminal Background' चा option म्हणजे आपल्या लोकशाहीला मोठा धब्बाच आहे. अशातच 'बेहती गंगामे हाथ धोनेवाले' काही कमी नाहीत. मग दिशाभूल म्हणा किंवा गोंधळ म्हणा, तो होतो तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्यांचा.
आज मतदान अगदी जवळ आल्यावर खरच प्रश्न पडतो कि 'मत द्यायचं कुणाला?' नक्कीच असं माझ्यासारख्या खूप जणांना वाटतय. Option च नाही म्हणून मत न देता सुट्टीचा फायदा घेऊन Picnicला जायचे बेतही आखले असतील काहींनी.
पण खरंच! 'मत द्यायचं कुणाला?' व्यक्तीला? पक्षाला? व्यक्तीला मत देऊन काही पडेल का? खरंच काही चित्र बदलेल का?
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे' ह्या शाळेत शिकलेल्या वाक्याचा अर्थ आत्ता कुठे उलगडू लागलाय. आत्ता कुठे मताची खरी किम्मत कळू लागलीय. पण तरीही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या…, गरिबी विसरता यावी म्हणून दारू पिउन चिंग होणाऱ्या…, आजही प्यायच्या पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या…, भूकमारीन मरणारी आपली लेकरं हताश होऊन पाहणाऱ्या…, गारपिटीने झोडपल्या गेलेल्या.... आम्हा जनतेला माझ्या बुद्धीजीवी मित्रांनी नक्की सांगाव, कि मत आम्ही कुणाला द्याव?